माझी ''भारतमाता'' ही 'वाघांना' जन्म देणारी जननी म्हणून ओळखली जाते. असाच एक ‘खरा वाघ’ सुमारे १०९ वर्षापूर्वी भारताच्या पंजाब प्रांतात जन्मला. एक नाटककार, एक लेखक, कवी, उत्तम क्रीडापटू, तत्वज्ञानी, उत्तम राजनितीतज्ञ म्हणजे "थोर अमर क्रांतिकारी शहीद भगतसिंग". जगाच्या पाठीवर कुठे-कुठे क्रांती झाल्या आहेत त्यांचा संपुर्णपणे अभ्यास करून त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांना” आपल्या गुरुस्थानी मानून देशसेवेची शपथ घेतली. बालपणात बंदूक व काडतुसांची शेती करून इंग्रजांना पळवुन लावु असा विचार करणारे भगतसिंगाना मात्र आयुष्याचा निर्णायक क्षणी भारतभुमिसाठी ‘विचारांच्या क्रांतीची’ गरज वाटली; म्हणून त्यांनी संसदेत रिकाम्या जागी बॉम्ब फोडून भारतीय तरुणांना एक विचार देण्याचा प्रयत्न् केला. त्यांनी भारतीय तरुणांच्या ह्रिदयात एक आगीची ठिणगी पेटवली जी आज पर्यंत प्रत्येक भारतीय तरुणाच्या ह्रिदयात, नसानसात भिनत आहे. “मरून कसे जगतात...?’’ हे दुनियेला दाखवन्यासाठी त्यांनी आत्म समर्पण केल. “मातृभुमी की बलीवेदि पर वार