Posts

अजेय

Image
  एक जातिवंत घोडा होता. अत्यंत रुबाबदार, उंच, पांढरा शुभ्र रंगाचा. मानेवरील मुलायम केसांपासून शेपटा पर्यंत अत्यंत विलोभनीय दिसणारा; जणू काही एक राजपुत्रच...! जसा दिसायचा त्याहून अधिक चपळतेने पळायचा अगदी वाऱ्याच्या वेगाने. या जगात त्याच्या सारखा घोडाच नाही. न भूतो न भविष्यती ! असा. नेहमी सरावात अव्वल राहणारा हा चेतक नेमका स्पर्धेत हारायचा. एकदा-दोनदा-पाचव्यांदा आता मात्र राजाला काही सहन होईना त्याने थेट तलवार उचलली आणि घोड्याचा डोकं आणि धड वेगळं करणार इतक्यात घोड्याची दैनंदिन देखभाल करणारा सेवक अत्यंत कळवळीने राजाची समजूत काढू लागला की कृपया, याला ठार नका मारू. फार विनवणी केल्यावर राजाने आदेश दिला, "जा घेऊन जा याला, माझ्या नजरे समोरून आणि तुलाही राज्यातून बेदखल करण्यात आले आहे." तो सेवक घोड्याला घेऊन राज्याचा सीमेवर एका गावात राहू लागला. रोज करायचा तसाच नित्य नियमाने घोड्याची देखभाल करू लागला. अशीच काही वर्षे गेली. आता पंचक्रोशीत एका नव्या घोड्याची चर्चा सुरू झाली. एक असामान्य घोडा जो कधीच हरत नाही. प्रत्येक स्पर्धेत अव्वल येतो म्हणजे येतोच. या जगात याला हरवणारा

व्यापार आणि भावना

Image
व्यापार आणि भावना कोरोनो नंतरच्या काळात अजाणतेपणी खूप गोष्टी बदलल्या आहेत. जितक्या सूक्ष्म स्तरावर विचार करू तितक्या प्रमाणात बरे-वाईट बदल आपणास जाणवतील. मेनस्ट्रीम व्यवसाय वर परिणाम झाल्यावर माझ्या एका ज्येष्ठ मित्राने घरी आइस्क्रीम व दुधाचे छोटेखानी व्यवसाय सुरू केला. घरातील आई किंवा पत्नी  वेळ मिळेल तसे व्यापार सांभाळतील आणि  यात काहीतरी अल्पशा का होईना अर्थार्जन होईल अशी त्यांची आशा. एक छोटी पूजा करून प्रसादासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं असताना मी त्या दिवशी पोहोचू शकलो नाही. परत काही दिवसांनी त्यांच्याकडे सहज चक्कर टाकली. मुळात आम्ही सोलापूरकर फार भावनिक व आदरतिथ्य आहोत. दादानी फार आदरपूर्वक स्वागत करून गेल्या काही दिवसात या व्यवसायातील झालेल्या सकारात्मक बदल सांगत होते. आता किमान शंभर-दोनशे रुपये तरी व्यापार होतो, अमुक ही मागणी असते इत्यादी इत्यादी...  आणि त्यांनी मला त्यांच्या उत्पादनाचं एक लोकप्रिय मसाला दुधाची ऑफर केली. आदरातिथ्य म्हणून त्यांनी वारंवार आग्रह केला... आईस्क्रीम घेणार का..?  हे घेणार का..? किंवा हे आवडेल का..?  मी मनापासून विनवणी करत त्यांना नकार दिला. खरंतर की

कर्मयोग...

Image
कर्मयोग विचारात घेताना भारताचे संत गुरुदेव श्रीरामकृष्ण यांचे स्मरण येणे अनिवार्यच आहे. कितीही आदर भाव जागृत असला तरी स्वामी विवेकानंद हे एक मित्राप्रमाणे वा जेष्ठ बंधू वाटतात आणि ठाकुरजींच्या प्रति फक्त आणि फक्त गुरुदेव अशीच प्रतिमा मनात ठासते. एका अत्यंत गरीब घरात जन्मलेले रामकृष्ण हे सर्वांना कालिमाते चे पुजारी म्हणून एक भक्ती योगी वाटतात. खरे तर प्रत्येक योगात (कर्म,भक्ती,ज्ञान,राज) कर्म करणे अनिवर्याच आहे. लहानपणा पासूनच काली मातेची ओढ लागलेली असताना वंश परंपरे प्रमाणे ते त्यांच्या गावा जवळील एका मंदिरात पुजाऱ्याची नोकरी करीत असत. साधारणतः दहा-बारा वर्षे वय होते त्यांचे. पण, या कालीची सेवेतही त्यांना आता भान राहत नसे. त्यांना त्या परम तत्वाचे, आनंदाचे दर्शन घेण्याची ओढ सतावत होती. आणि आता ते पूर्ण वेळ साधानेसाठी त्या मंदिराच्या पायथ्याशी गंगेच्या किनारी एक कुटी बांधून वास्तव्यकरण्यास सुरुवात केली. श्रीरामकृष्णांनी त्या एकाच ठिकाणी बसून यत्नांचे यज्ञ केले. आणि त्यांना त्या दिव्यअनुभूती चे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या त्या कर्मात एवढी ताकद होती की त्याच ठिकाणी वेळोवेळी श्रेष्ठ हुन

युवराज सिंग

Image
प्रिय मित्र युवराज सिंग    तू आलास तेव्हा नुकतच कुठे भारतीय क्रिकेट उमलत होतं... नजरेत नजर मिळवायची हिंमत दाखवत होतं.... डिफेन्स करत मैदानावर टिकणे शिकत होतं.... आणि आत्ता कुठे शंभरच्या स्ट्राईक रेटने धावत होतं. मग तू आलास!!! (हे वाक्य एमएस धोनी सिनेमाप्रमाणे “फिर आता है युवराज सिंग” अशा ट्यून मध्ये फिल कराव) युवराज...!!!!!!!            ज्यांनी क्रिकेट जन्माला घातलं त्यांच्या नजरेला नजर भिडून हम भी है जोश में म्हणत त्यांच्याच लॉर्डसवर 300 प्लस चेस करून “दादाला” टी-शर्ट काढून फिरवयाची संधी मिळवून दिलीस...! तू अख्खा जगाला सांगितलं “ये नया इंडिया है... ये चेस भी करेगा और आंखोसे आंख भी मिलायेगा...!” शंभरच्या स्ट्राइक मध्ये धन्य माणनाऱ्या टीम इंडियाला तू ‘एकशे पन्नास’ च्या गतीने धावायला लावलंस!   जॉन्टी रोड्स चे बरेच किस्से आम्ही ऐकायचो; पण खरा जॉन्टी आम्हाला तुझ्या रुपाने मैदानात दिसला आणि आम्ही ही तुझ्यासारखे कॅच पकडण्याच्या प्रयोगात हात पाय मोडून घेतले. परंतु तू थांबला तरी त्या क्षेत्रातून बॉल सीमेकडे जाणार नाही या शाश्वातीने भारताची बॉलिंग लायनप सुधारत गेली. ती आज जगात अव्वल

डेटा आणि आपण

Image
डेटा आणि आपण एक काळ होता जेव्हा फक्त आयटीचा ट्रेंड होता पण पुढील वीस वर्षे फक्त आणि फक्त "डेटा" चाच काळ असेल- जॅक मा हल्ली आपण ऐकतोय आधार डेटा लिक झाला, प्रायव्हसी हॅक, डेटा साठवणे, फेसबूक- केंब्रिज ऍनलॅटिक्स इत्यादी इत्यादी. पण नेमका डेटा म्हणजे काय??? सरळ शब्दांत काय झालं तर "माहिती"..! हो डेटा म्हणजे फक्त माहिती आणि ती गणिते स्वरूपात मांडणे म्हणजे ऍनलॅटिक्स. बर मग डेटा आणि आपला काय संबंध?? अहो तुमचीच माहिती म्हणजे डेटा.  आमची वैयक्तिक माहिती कुणाच्या कामाची?? आणि  आमची माहिती घेऊन ती लोकं काय लोणचं करणार आहे..? हो !!! तेही आंब्याचं ..! 2016 मध्ये एक प्रयोग फेसबुक ने चालू केला होता. आपले वैयक्तिक व्हाट्सअप नंबर आणि फेसबूक लींक करण्याचा. जसे आता इंस्टाग्राम फेसबुक आहेत तसेच. पण या प्रयोगाला भारतातून प्रचंड विरोध झाला. पुढे फेसबुक ने ही प्रक्रिया गुंडाळली. आपले वैयक्तिक मेसेज हवे तर कशाला त्यांना..? या "झुक्याला" आपल्यामध्ये इतका इंटरेस्ट काय आहे..? खरे सांगायचे झालं हा त्यांचा खरा व्यवसाय आहे.! आपल्या बद्दल माहिती मिळवायची आपल्या सवयी, आवडी, सहली,

Think Out of The Box!

Image
 सोलापुरात ३० वर्षापासून आमचं एक छोटस सायकलीच दुकान आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल कि अश्या प्रत्येक दुकानात एक ‘टिपिकल’ हवा भरण्याच मशीन असत, की ज्याचं बटन दाबल की हवा चालू होती आणि बंद केलं की हवा थांबते. असा पंप साधारण ४००० रुपयांच्या आसपास बाजारात मिळतो.      दोन वर्षापूर्वी मी एक बदल केला एक “आटोमेटेड” मशीन आणली ज्याची किंमत पूर्वी असलेल्या पंपा पेक्षा पाचपट जास्त म्हणजे २०००० हजार होती. या नव्या मशीन मुळे एक ‘अमुलाग्र’ बदल आमच्या कामात झाला. कामाचा वेग तर वाढलाच पण या नव्या मशीनसाठी फक्त सकाळी एकदाच वीजपुरवठा चालू करायचं आणि रात्री जाताना बंद करायचं इतकच माझं काम; बाकी हवा ‘स्टाँक’ करून घेणे, गरज असताना हवा सोडणे हि मशीन स्वतःच करून घेते.  यातून एक गोष्ट लक्षात येत आहे का आपल्याला...???  की मी त्या पूर्वीच्या मशीनसाठी काम करत होतो आणि हि नवीन मशीन माझ्यासाठी काम करते...!!!! अगदी...अगदी ...अगदी असाच दृष्टीकोनातून  आपण आपल्या आयुष्याबाबत, दैनदिन कामा बाबतीत बघायला हव, म्हणजे “पैसा हा माझ्यासाठी काम करतोय की मी पैश्यासाठी ..?” माणूस म्हणून या श्रेष्ठ प्राणी प्रकारात आपला जन्म झाला

दोन झाडं

Image
               दो न झाडं                                  हि गोष्ट आहे दोन झाडांची. दोन्ही झाडं वेगळ्या प्रकारची, दोघांचा वैशिष्ट्य-गुणधर्म सारं काही वेगळं फक्त जातीन झाडं होती एवढंच. उदाहरणादाखल आपण एक झाडं कडुलिंब तर दुसरा बदामाचं समजुयात. दोघांच जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालं होतं. ‘रोपवयात’ दोघांना सारखाच वातावरण मिळालं. तोच सुर्य, तोच पाऊस, तीच मंद झुळूक हवा यांच्या आशीर्वादानं दोन्ही वाढली. पण यात बदामाच झाडं लवकर बहरायला लागलं. सगळे म्हणायला लागले की ‘किती छान वाढतंय हे बदामाच झाडं...! आणि हे काय कडुलिंबाचं कधी वाढणार काय माहित..? खरं तर दोन्ही झाडं वाढतच होती परंतु कडुलिंबाची वाढ हि सावकाश होत होती. आतातर बदामच झाड गोड-गोड बदाम पण द्यायला लागलं. असेच काही वर्ष सरून गेली. गावात एक दिवस वादळ आलं, मोठ्ठ वादळ. तुफान वारा, मुसळधार पाऊस. यात ते बदामाचं झाडं दुर्दैवाने उळमळून पडलं. फार वाईट झालं. पण या वादळात ते शेजारचं कडुलिंब मात्र टिकलं. कडुलिंब पुढे जोमाने वाढतच राहिलं. त्याच रुपांतर पुढे मोठ्या विस्तीर्ण झाडात झालं आणि पुढे कित्तेक वर्षे ते सर्वांना थंड सावली आणि शुद